नांदेड दि.३० :स्थानिक स्वराज्य संस्थाकडील राखीव निधी खर्चाप्रमाणेच आमदार – खासदार विकास निधीत सुद्धा दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी निधी खर्च करण्याचे शासन निर्णय आहेत.
नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून दरवर्षी आप आपल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी १५ लक्ष रूपये खर्च करण्याची सन्मानिय आमदार महोदयांसाठी विशेष तरतूद आहे तर केंद्र सरकारच्या एम्पीलैड्स मध्ये सुद्धा सन्मानिय खासदार महोदयांना आप आपल्या मतदारसंघातील बेरोजगार दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी २५ लक्ष रूपये खर्च करण्याची तरतूद असतांना एकाही आमदार – खासदाराने हा निधी खर्च केला नाही.बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडून गत पाच वर्षांपासून या निधी खर्चासाठी नियोजन विभागाकडे पाठपुरावा केला असता नियोजन विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देत सदरील हा निधी खर्च करणे बंधनकारक नसुन तो आमदार खासदारांसाठी ऐच्छिक बाब असल्याचे सांगण्यात आले.यावरूनच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची दिव्यांगांप्रती असलेली उदासीनता दिसून येते.मतदारसंघातील विविध घटकांचा विकास व्हावा त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ व्हावा यासह आपल्या विविध मागण्या.प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि त्या सोडवुन घेण्यासाठी लोकप्रतिनिधींची निवड केली जाते आणि निवडीत दिव्यांगांच्या मतदानाचा सुद्धा मोठा सिंहाचा वाटा असतो परंतु निवडून आलेले प्रतिनिधीच जर आपल्या विविध समस्या.मागण्या सोडविण्यासाठी विधानसभेत-लोकसभेत प्रश्न मांडत नसतील, आपल्याकडील निधी खर्च करत नसतील तर मग मतदान करून तरी काय फायदा असा प्रश्न दिव्यांगांपुढे उपस्थित झाला आहे.अपंग पुनर्वसन कायदा १९९५ ची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे हा कायदा कडक करून RPWD – ACT 2016 हा दिव्यांगांसाठी नवीन कायदा पारीत करण्यात आला आहे तसेच महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग धोरण २०१८ सुद्धा ठरविण्यात आले असताना याची अद्याप कुठेच अमंलबजावणी झालेली नाही, त्यामुळे आमदार – खासदारांनी या पाच वर्षांत दिव्यांगांच्या बाबतीत काय-काय दिव्वे लावले ते स्पष्ट चित्र दिसत आहे एकीकडे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण भारतभर दिवे लागले परंतु दिव्यांगांच्या दारी कोण दिवे लावणार यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य आता जवाब दो आंदोलनांच्या पावित्र्यात असुन लवकरच नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर टाळ-मृदंग बजाव आंदोलन करणार असल्याचे दिव्यांग समीतीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी सांगितले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड