हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहर व तालुक्यात दि 11 फेबुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळीवाऱ्यासह गारांचा पाऊस झाला यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्या कडे केली आहे.
हिमायतनगर शहरां सह तालुक्यातील वाघी, जवळगाव, कामारी वारगटाकळी, सरसम, पळसपुर,घरापुर,खडकी, बोरगडी, टेंभुर्णी, सिरपल्ली, सह आदी गावात अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सायकाळी 4 ते 5 च्या सुमारास सुपारी पेक्षाही मोठ्या गारा पडल्यामुळे अनेकांचे एकच धावपळ उडाली होती. तर शेती पिकात असलेल्या हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर आंब्याच्या झाडाला आलेलं मोहर देखील मोठया प्रमाणात गळून पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ह्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या कडे केली आहे…
शेतकरी
⬛ शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान..:- प्रल्हाद पाटील
तालुक्यातील टेंभुर्णी / पावनमारी परिसरात झालेल्या अचानक गार पिठी मुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा,गहू,पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अगोदरच अस्मानी संकटाने शेतकरी परेशान होता आणि आता ह्या सुलतानी संकटाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ह्याचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळून द्यावी अशी प्रतिक्रिया टेंभुर्णी येथील शेतकरी प्रल्हाद पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिल्या आहेत..