नांदेड दि.९: स्वातंत्र्य आंदोलनानंतर देशात वाढलेली गरीबी दुर करण्यासाठी गरीबी हटाव चा नारा देत काँग्रेस समाजात काम करत आली. तोच विचार आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवला. दारिद्र्य रेषेखालील जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या. साक्षरतेचे प्रमाण वाढवून त्यांना रोजगार निर्माण करून दिला. काँग्रेसच्या राजकारणाचा पाया हा समाजकारण आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. हा विचार देशातील कित्येक तरूणांना प्रभावित करत आहे. त्यातीलच एक तरुण हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस चा सक्रिय कार्यकर्ता संतोष आंबेकर. गरीब, वंचित, शेतमजुर यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी काँग्रेस च्या नेतृत्वात स्वतःला झोकून देऊन काम करताना दिसतोय.
तो अशी भावना व्यक्त कि,
“आम्ही जलमलो माती किती होणार गं माती
खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती”
या कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळी शेतकर्यांच्या दयनीय व केविलवाण्या परिस्थितीचे भयावह चित्र समाजासमोर मांडण्यास अगदी समर्पक आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी असुन माझ्यासारख्या शेतकर्याच्या पोराला विचार करायला लावणारं आहे. किंबहुणा हे बदलण्यासाठी कुणी अवतार घेणार नसुन मला आणि माझ्यासारख्या युवकांना हे चित्र बदलण्यासाठी समोर यावं लागेल. स्वयंस्फुर्तीने हे सामाजिक उत्तरदायित्व स्विकारून सामाजिक, राजकीय चळवळीत सहभागी होऊन समाज परिवर्तनाच्या लढाईत स्वताला झोकुन देऊन, जात-पात, धर्म-पंथ या विषमतावादी जोखडाच्या पलिकडे जाऊन छत्रपती शिवराय, फुले,शाहु,आंबेडकर, महात्मा गांधीजी, आण्णाभाऊ यांच्या विचारांवर समाजपरिवर्तनासाठी झगडणे गरजेचे आहे.
त्यामुळे ते प्रथम लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन सामाजिक चळवळीत सक्रिय झाला. बहुजन, दलित, कष्टकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदा तत्पर असणारा कार्यकर्ता म्हणुन तालुक्यात ओळख निर्माण केली. अतिशय अल्प काळात मंगरुळ या गावात सर्वच महापुरूषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन आणि त्या निमीत्ताने सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन आणि त्यातुन मजबुत संघटन बांधणी केली. सर्वांच्या सुखदुखात स्वताची हजेरी लावणारा आणि होईल ती मदत करणारा. कोणी दुर्धर आजाराने ग्रासला असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करून आणि लोकवर्गणीतुन जनतेचे जीव वाचवण्यासाठी झगडणारा लोकसेवक अशी प्रतिमा ज्यांची आहे. सामाजाला मोठ्या प्रमाणात न्याय द्यायचा असेल तर राजनीतिक शक्ती प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रेकार्ड ब्रेक मते घेऊन ग्रामपंचायत सदस्य म्हणुन नियुक्ति झाली. ग्रामपंचायत सदस्य पदावर असुनही गावातील प्रत्येक समस्याग्रस्त संतोषराव आंबेकर यांनाच भेटणार. आपल्या समस्येचं निराकरण करुण तो गावकरी निघणार. आता तर उपसरपंच पदावर विराजमान होऊन गावाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी सतत कार्यरत असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ संघाचे कार्यकुशल व कर्तव्यदक्ष आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिमायतनगर काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्ष पदांची जबाबदारी सोपवली. अगदी एका वर्षात त्यांनी पक्षांच्या विचारांना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं.
खैरगाव-मंगरूळ पुलाचा विषय लावून धरून त्या पुलाचे काम आज पुर्णत्वास जात आहे. गावात बस सुविधा जेव्हा ब़ंद करण्यात आली तेव्हा हदगाव आगाराला आंदोलनाचा इशारा देताच तात्काळ बस सेवा सुरु करण्यात आली. राज्य सरकारने ५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला व थेट शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन तो निर्णय मागे घ्या अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला. तो निर्णय ही सरकारने मागे घेतला. हिमायतनगर शहरात सामाजिक न्याय विभागाने शासकीय वस्तीगृह मंजुर करावे ही मागणी करणारा हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नेता तो म्हणजे संतोष आंबेकर.
सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय आणि सोसायटीच्या संचालक मंडळावर निवड होऊनही जमिनिशी नाळ जोडून असलेला नेता ज्याच्यातला कार्यकर्ता सदा जिवंत असतो. म्हणुन त्यांच्या सामाजिक व राजकिय लढाईचा अल्पपरिचय समाजातील युवकांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करुन देणे मला गरजेचे आहे असे वाटते. काँग्रेस का हाथ गरीबोंके साथ हा विचार जगणारा तरूण समाजपटलावर येवो.काँग्रेस विचारधारेला अभिप्रेत त्यांचे कार्य निरंतर चालू राहो व समाजातील गरीबी दुर करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या चळवळीला त्यांच्यामुळे बळ प्राप्त होवो हीच अपेक्षा. श्री.अनिल काशिनाथ कांबळे
महानगर कार्याध्यक्ष, नांदेड काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग
#सत्यप्रभा न्युज #नांदेड