छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
विजय पाटील
दि: २५:राज्यातील महिला व मुलींच्या रोजगार निर्मितीस चालना देण्यासोबतच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी महिलांना पिंक अर्थात गुलाबी ई- रिक्षा देण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील पात्र गरजू महिलांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
योजनेचे स्वरुप आणि लाभार्थ्यांची पात्रता अशी…
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय २० ते ४० वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुसरक्षण गृह बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता यांना प्राधान्य.तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय खोकडपुरा येथे अर्ज करणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून होईल.
अर्थसहाय्य व कर्ज परतफेड
ई-रिक्षा किमतीच्या १० % पात्र लाभार्थी, राज्य शासन २० % आणि बँक ७०% कर्ज उपलब्ध करून देईल. कर्जाची परतफेड ५ वर्षे (६०) महिने आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर