लातूर प्रतिनिधी
! विजय पाटील !
दि : ०८/०३/२०२४
देवणी (Latur) : तालुक्यातील (Devani taluka) हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात महाप्रसादासाठी करण्यात आलेले (Bhagar poisoned) भगर खाल्ल्याने तालुक्यातील वाघनाळवाडी (Waghnalwadi) व खरबवाडी येथील ४४३ जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. सर्वच रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती सोनवणे यांनी दिली आहे.
खरबवाडी व वाघनाळवाडी या दोन्ही गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गुरुवार दि. ७ मार्च रोजी एकादशी असल्याने उपवासासाठी केलेल्या प्रसादात भगर करण्यात आले होते. संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान नागरिकांनी (Bhagar poisoned) भगरीचे सेवन केले होते. त्यानंतर काही तासानंतर गरगरणे ,मळमळ,उलटी , उच्च रक्तदाब व डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागल्याच्या तक्रारी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रास या घटनेची माहिती देण्यात आली. माहीती मिळताच (Devani taluka) तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वाती सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमन काळे, डॉ.ज्ञानेश्वर गायकवाड ( वलांडी) यांच्या पथकाने वाघनाळवाडी गावात रात्री ११ वाजता दाखल होते. ३०६ रूग्णांवर गावातील मंदीरावर उपचार केले. तर ६ रूग्णांना (Devani Hospital) ग्रामीण रूग्णालय देवणी तर, ३ रूग्णांना वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
खरबवाडीत (गुरधाळ)१२८ जणांना विषबाधा
तालुक्यातील (Devani taluka) खरबवाडी ता.देवणी येथेही सारखीच घटना घडली. येथेही प्रसादाच्या (Bhagar poisoned) भगरातूनच १२८ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नागराळ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुरी गायकवाड यांचे पथकही खरबवाडी येथे दाखल होत. ९३ जणावर गावातच तर २८ जणांवर (Devani Hospital) ग्रामीण रूग्णालय देवणी तर ७ रूग्णांना उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दोन्ही गावांतील रूग्णावर आरोग्य विभागाच्या पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. वेळेत उपचार मिळाल्याने सर्वच रूग्णांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
वाघनाळवाडी व खरबवाडी येथील दोन्ही घटना सारख्याच आहे. दोन्ही ठिकाणी प्रसादासाठी वापरण्यात आलेला (Bhagar poisoned) भगरही एकाच कंपनीचा असून प्रथमदर्शनी तरी भगरीतूनच विषबाधा झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नमुना तपासणीसाठी लातूरला पाठवण्यात आले. अहवाल आल्यानंतरच बोलणे उचित ठरेल. ४४३पैकी एकाही रूग्णांची प्रकृती गंभीर किंवा अति गंभीर नसून सर्व रूग्णांची प्रकृती सामान्य असून काळजीचे काहीही कारण नाही. शिवाय आरोग्य विभाग त्यांच्या वर लक्ष ठेवून आहे.
-डॉ.स्वाती सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी,देवणी
सत्यप्रभा न्यूज