प्रगतिशिल शेतकरी बालाजी पाटील सवंडकर यांच्या पुढाकारातून अनेक शेतकरी वळाले पपई लागवडीकडे
हिंगोली दि.२८:कळमनुरी तालुक्यातील खालचा भाग ईसापुर धरणाच्या उजव्या कालव्यामुळे मागील दोन तीन दशकापासून बागायती क्षेत्र म्हणून चांगल्या प्रकारे ओळखल्या जातो परिसरातील डोंगरकडा या गावातील अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रकारची आधुनिक पिके आपल्या शेतीत घेत संपूर्ण देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर ही आपला ठसा उमटविलेला आहे आणि त्याच डोंगरकड्यांचा शेतकऱ्यांचा आदर्श घेत या भागातील अनेक गावातील शेतकरी मार्गक्रमण करत असतात..
परिसरातील डोंगरकडा, जवळा पांचाळ,दांडेगाव ,दिग्रस ,सालापूर, पार्डी बागल, रेडगाव वडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत अनेक आधुनिक प्रकारचे प्रयोग यशस्वी राबविले आहेत ही या परिसराची ओळख आहे या भागातील शेतकरी हा आधुनिक व प्रयोगशील बागायतदार म्हणून ओळखला जातो आणि याच ओळखीच्या बळावर येथील शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय ही हा नफ्यात असू शकतो याचे उदाहरण अनेक वेळा आपल्या विविध प्रयोगातून यशस्वीरित्या सिद्ध केले आहे..
या परिसराला डोंगरकडा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास लाभला असून त्याचबरोबर हा परिसर एकेकाळी केळी उत्पादनात फार मोठ्या आघाडीवर होता त्यानंतर हाच भाग हळद या पिकासाठी ही नावाजलेला होता पारंपारिक शेतीबरोबरच अनेक फळबागा व भाजीपाल्यांचे यशस्वी अनेक शेतकऱ्यांनी या भागात घेतले आहेत..
रेडगाव हे अगदी ४०० ते ५०० उंबरठे असलेले गाव असून या गावी केळी, हळद ,ऊस आणि पारंपारिक पद्धतीचे पिक घेत असतात अलिकडेच येथील उपक्रमशील शेतकरी बाजीराव पाटील सवंडकर यांनी पेरू बागेची यशस्वी लागवड या ठिकाणी केली त्यानंतर श्री बालाजीराव पाटील सवंडकर यांनी मागील २ वर्षापूर्वी पपई या कल्पतरू ठरणाऱ्या व शेतकऱ्यांसाठी कायम आर्थिक स्त्रोत असणाऱ्या पिकाची यशस्वी लागवड व व्यवस्थापन करून त्यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा एक सोपा मार्ग या ठिकाणी निर्माण करून दिला आहे त्यां
नी आपल्या प्लॉट बरोबरच येथील जवळपास शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना पपई लागवडी संदर्भातील माहिती तंत्रज्ञान त्याचं अचूक व्यवस्थापन आणि त्याचबरोबर पपई या पिकाचे संरक्षण यातील धोके आणि यासाठी उपलब्ध असणारी बाजारपेठ याबद्दल सखोल मार्गदर्शन करून आपल्या रेडगाव व परिसराची ओळख पपई क्लस्टर कडे घेऊन जाण्याचा चंग बांधलेला दिसून येतो आहे ..
पपई लागवड हे किफायतशीर पीक…!
पपईचे आर्थिक आयुष्य जास्तीत जास्त ४ वर्षे टिकते. तथापि, शेतकरी आपले हे पिक 2-3 वर्षांपेक्षा जास्त वाढवत नाहीत कारण ३ वर्षांनंतर उत्पादन कमी होते. उत्तम शेती व्यवस्थापन आणि वेळेवर काळजी घेतल्याने पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
पपई लागवडीसाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. हे एक बहुमुखी पीक आहे आणि भाजीपाला, फळे आणि लेटेक्ससाठी लागवड करता येते, औषधासाठी कच्चा माल म्हणून सुक्या पानांना देखील बाजारभाव असतो.
#सत्यप्रभा न्यूज #हिंगोली