नांदेड दि. ७:- स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत दि.०१ जुलै, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान” राबविणे बाबत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अधिभयान संचालनालय, मुंबई यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.०६/०७/२०२४ रोजी सकाळी ११.०० ते ०२.०० या वेळेत क्षेत्रिय कार्यालय क्र.०१ ते ०६ अंतर्गत कल्याण नगर तरोडा बु, हमालपुरा,विष्णुनगर, गणेश नगर, यशवंत नगर, देगावचाळ, गंगाचाळ, पकीचाळ, गोलचाळ, भिमघाट, त्रिपिटक बौद्ध विहार परिसर, गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी नवीन कौठा परिसर अशा विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
सदर अभियानात महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शहरातील स्वच्छता प्रेमी नागरीक, जेष्ठ नागरीक, इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी सक्रीय सहभाग नोंदवून वरील विविध ठिकाणच्या संपूर्ण परिसरात साफसफाई करुन कचरा उचलून घेतला आहे.
नागरिकांनी “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवून मनपा प्रशासनास तसेच नांदेड शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
या अभियानात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, सहाय्यक आयुक्त गुलाम मो.सादेक, सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी, सर्व स्वच्छता निरिक्षकासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड