नांदेड : मराठा समाजाचा सरसकट OBC प्रवर्गात सामवेश करुन कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळाले पाहिजे म्हणुन मागील १७ दिवस जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करीत होते, प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेवून चाळीस दिवसाचा अवधी त्यांनी सरकारला दिला होता.परंतू अद्याप मराठा समाजाला न्याय मिळाला नसल्यामुळे जरांगे पाटील परत त्याच ठिकाणी साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतले आहे. त्यांनी संबंध महाराष्ट्रात संविधानाच्या चौकटीत राहून शांततेच्या मार्गाने सर्व समाज बांधवांनी साखळी उपोषण करावे असे आव्हान हे केले, त्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी २९ सप्टेंबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा भगिनी नांदेड जिल्हाभरात उपोषणाला बसणार आहेत.असा इशारा सकल मराठा समाज वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड