नांदेड प्रतिनीधी:जिल्हा परिषद मार्फत निघालेल्या पदभरतीच्या अर्जाचे शुल्क भरण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधून 50,000/ रुपये आर्थिक मदत मिळावी अर्जाद्वारे अशी विनंती पाथरड येथील युवक लक्ष्मण वाठोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली
त्यांनी आपल्या अर्जात मांडले की सध्या ग्रामविकास खात्यामार्फत जिल्हा परिषद मार्फत अनेक पदासाठी भरती निघाली असून त्यासाठी अर्ज करण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 900 रुपये फीस आकारली जात आहे आणि तो अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 300 रुपये वेगळे पैसे लागत आहेत आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती मागील 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ पडला असून शेतीचे पण आर्थिक नुकसान झाले आहे त्यामुळे माझे कुटुंब अर्थीक अडचणींचा सामना करत आहे,सरकार ने शुक्ल आकारले आहे ते एक मागासवर्गीय व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाचा विद्यार्थी असून मला परवडणारे नसून आपण जिल्ह्यचे पालक म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधून 50000 रुपये ची आर्थिक मदत करून माझे आर्थिक,मानसिक व शैक्षणिक समाधान करावे असे लक्ष्मण वाठोरे यांनी म्हटले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड